Vanchit Bahujan Aghadi। राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाने जागावाटपावर सध्या काम सुरु केलंय. त्यानुसार प्रत्येक पक्ष जागांवर दावेदारी करत आहे. त्यातच राज्यात सध्या सर्वात जास्त चर्चा महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाची सुरु आहे. वंचितने जरी मविआला हात दिला असला तरी पक्षाला हव्या असणाऱ्या जागा देण्यावर सध्या आघाडीत दोन गट पडलेत. त्यावरून वंचितकडून मविआच्या नेत्यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यात मोठा दावा करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात मविआवर मोठा आरोप करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून वंचितला हरणाऱ्या जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असा धक्कादायक दावा वंचितने पत्रात केला आहे. वंचितच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हे पत्र ट्विट करण्यात आलंय. “वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी 6 मार्च 2024ला पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत नेत्यानं यांना एक महत्त्वपूर्ण पत्र लिहलंय.
पत्रात नेमकं काय म्हटलंय? Vanchit Bahujan Aghadi। Vanchit Bahujan Aghadi।
“६ मार्च, २००२४ ला फोर सिझन्स, वरळी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकी संदर्भात हे अतिशय महत्त्वाचे पत्र मी आपणा तिघांना वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने लिहित आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटप अद्याप प्रलंबित आहे. ह्यात भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा 10 जागांवर आणि तीनही पक्षात 5 जागांवर अशा एकूण 48 पैकी 15 जागांवर निर्णय होत नाही (tie आहे) अशी परिस्थिती आहे”, असं पत्रात म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी महाविकास आघाडीला लिहलेल्या पत्रातील मुद्दे !#VBA #mva #prakashambedkar pic.twitter.com/5uaaVr1z7F
— Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) March 8, 2024
‘जाणीवपूर्वक ‘हरणाऱ्या’ जागा वंचितला द्यायच्या आणि…’ Vanchit Bahujan Aghadi।
“ जाणीवपूर्वक ‘हरणाऱ्या’ जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या आणि उर्वरित मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदारांचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा आहे, असे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं मत झालं आहे. ‘आपली लक्षणीय मते हवीत पण जिंकू शकणाऱ्या जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या नाहीत’ हेच मविआचे धोरण आहे हा ग्रह कार्यकर्त्यांचा होत आहे”, असं वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पत्रात म्हटलं आहे.