आ. कानडे; बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचा लोकार्पण सोहळा
श्रीरामपूर – जलजीवन योजनेअंतर्गत वितरिका टाकताना सर्व रस्ते खोदले जाणार आहेत. श्रीरामपूर तालुक्यातल या रस्त्यांसाठी आपण निधीची आधीच तरतूद करून ठेवली आहे. बेलापूरसह इतर ठिकाणी सुरू असलेल्या अशा ग्रामपंचायतींनी त्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून आपल्या कार्यालयात प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले.
बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर आमदार लहू कानडे यांच्या सुमारे दीड कोटी रुपये खर्चाच्या निधीतून लावण्यात आलेल्या स्ट्रीटलाईटचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी आ. कानडे बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, महिला प्रदेश महासचिव डॉ. वंदना मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जि. प.चे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, उद्योजक अंकुशराव कानडे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष संजय छल्लारे, माजी नगरसेवक मुक्तार शहा, माजी सरपंच भरत साळुंके, माजी उपसरपंच रविंद्र खटोड, इस्माईल शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन गुजरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, ग्रामपंचायती या विकासाची मंदिरे आहेत. तेथे आपण हस्तक्षेप करावा, असे आपणाला कधीच वाटले नाही. मात्र काही अनिष्ट गोष्टी कानावर आल्यानंतर मात्र त्याकडे आपले लक्ष वेधले जाते. तत्कालीन महाविकास आघाडीने राज्यातील विकास कामांचा काही हिस्सा केंद्राकडे दिल्यानंतर काही योजना राज्यात राबविल्या गेल्या असल्याचे कुणालाही विसरता येणार नाही. भविष्यात श्रीरामपूर आणि बेलापूर हे एक होणार आहेत.त्यामुळे या रस्त्यासाठी आपण १८ कोटी रुपये मंजूर केले. त्यात विजेची तरतूद नसल्याने स्ट्रीट लाईटसाठी दीड कोटी रुपयांचा निधी आमदार निधीतून मंजूर केला. दत्तनगर आणि टाकळीभान रस्त्याचेही अशाचप्रकारे विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
विरोधकांनी आपल्या विरोधात अनेक षड्यंत्र रचली तरी आपण हिम्मत हरलो नाही. जनतेचा पाठिंबा जोपर्यंत या मतदारसंघात मिळेल, तोपर्यंत आपण या मतदारसंघाचे नाव उंचावर नेऊ, राजकारण आणि समाजकारणात हिम्मत धरावी लागते, लढावे लागते. ज्यांच्यात लढण्याची हिंमत नाही. त्यांनी राजकारणात पडू नये, असे ते म्हणाले.आजतागायात केवळ श्रीरामपूर तालुकाच नाही तर मतदार संघात सुमारे 80 टक्के रस्त्याची कामे आपण पूर्ण केली असल्याचे आ. कानडे म्हणाले.
यावेळी संजय छल्लारे, रविंद्र खटोड यांनी आ. कानडे यांच्या विकास कामांची प्रशंसा केली. सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण पाटील नाईक यांनी तालुक्यातील विकास कामांची माहिती दिली. अड. मधुकर भोसले यांनी सूत्रसंचालन केले.साई पावन प्रतीस्थांचे अध्यक्ष कैलास चायल यांनी आभार मानले. यावेळी सचिन जगताप, सरपंच अशोक भासले, नानासाहेब रेवाळे, दीपक कदम , प्रताप देवरे, सुधीर वायखिंडे, अँड. दीपक बारहाते, अनिल बिडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, राजेश खटोड, द्वारकानाथ बडधे, बाबासाहेब ढोकचौळे, बाळासाहेब मुंगसे, श्रीधर खंडागळे, गोरख पुजारी, दीपक निंबाळकर, अविनाश पवार, लहानू नागले, पोलीस पाटील अशोक प्रधान, दादासाहेब कुताळ, दिवाकर कोळसे यांच्यासह बेलापूर, उंबरगाव, वळदगाव, बेलापूर खुर्द, नर्सरी, उक्कलगाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजूनही काही लोक अनाडी!
तालुक्यात काही लोक अजूनही अनाडी आहेत. जाहिराती देऊन विकास कामे करता येत नाहीत, हे त्यांना अजूनही उमगलेले नाही. आपण निवडून आल्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्याचे विरोधकांच्या लक्षात आले. पूर्वी मंजूर झालेली कामे त्यांनी रद्द केली. काही स्थगित केली. आपण हिमतीने न्यायालयात लढलो आणि त्यांच्या नाकावर टिच्चून ती कामे मंजूर असलेली कामे आपण सुरू केली.