सोनई – नेवासे तालुक्यातील खरवंडी युवक दत्तात्रय अभिमन्यू भोगे याने मराठा आरक्षणासाठी सोमवारी आत्महत्या केली. बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली. यावेळी भोगे याने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या उपयोग पडावे म्हणून मी आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खरवंडी येथील दत्तात्रय भोगे याने आत्महत्या करून जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दिल्याचे चिठ्ठी लिहिले होते. शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र कर्पे हे रजेवर असल्याने सोनई पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक माणिक चौधरी यांनी हा गुन्हा नोंदवून घेतला. मयत दत्तात्रय अभिमन्यू भोगे यांच्या घरी भेट दिली व मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठीवर आक्षेप घेऊन अरेरावी करून निघून गेल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.