नवी दिल्ली – महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणमच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्व ग्राहकांना 200 रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाईल.यामुळे आता गॅस सिलेंडरचे दर तब्बल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाईल. म्हणजेच त्यांना गॅस सिलिंडरवर 400 रुपयांची सूट मिळणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली.
केंद्रीय मंत्री म्हणाले की उज्ज्वला योजनेंतर्गत लोकांना गॅस सिलिंडरवर 200 रुपये वेगळे अनुदान दिले जाईल. म्हणजेच त्यांना एकूण 400 रुपये अनुदान दिले जाणार आहे. सर्व ग्राहकांना 200 रुपये अनुदान दिले जाईल. याआधी 1 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात केली होती.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शनही दिले जाणार आहेत. त्यांना पाईप आणि स्टोव्हही मोफत दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, गॅस सिलिंडर पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत,
चांद्रयान 3 शी संबंधित सर्वांचे कॅबिनेटमध्ये कौतुक करण्यात आले
मंत्रिमंडळ बैठकीची माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली. चांद्रयान मिशन 3 च्या यशामुळे देश आणि जगात आपला दर्जा उंचावला आहे. हे यश म्हणजे भारताची मोठी प्रगती आहे. आता २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. मंत्रिमंडळाने चांद्रयान 3 शी संबंधित सर्वांचे कौतुक केले आहे.