विश्रांतवाडी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. तसेच फुलेनगरमधील दत्त मंदिरातील दुपारच्या विसाव्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे शहराकडे मार्गस्थ झाली.
दरम्यान विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, कळस, येरवडा परिसरातील सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांच्यावतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांसाठी अन्नदान, आरोग्य तपासणी, औषध वाटप, पाणी, फराळ, फळे, बिस्कीट, राजगिरा लाडू व चिक्की वाटपाबरोबरच विविध सेवा, उपक्रमांचे आयोजन केले होते.
फुलेनगरमधील मंदिरात माजी नगरसेविका शीतल सावंत, सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत परिवाराच्यावतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला.विश्रांतवाडीत आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, माजी नगरसेविका रेखा टिंगरे, ऐश्वर्या जाधव, हुलगेश चलवादी, स्वीकृत सदस्य चंद्रकांत जंजिरे, जितेंद्र जगताप, संजय कदम, माजी नगरसेवक सतीश म्हस्के, सागर माळकर, ऍड. रेणुका चलवादी, माजी नगरसेविका सुनिता साळुंके, अनिल साळुंके, सामाजिक कार्यकर्ते विशाल टिंगरे, शशिकांत टिंगरे, विनोद पवार, सचिन टिंगरे, सोमनाथ टिंगरे, राजू ठोंबरे, सोनाली ठोंबरे, संदीप दांगट, संगीता दांगट, कुणाल टिंगरे, अभिजित उकारडे, मंगेश परदेशी, राहुल जाधव, डॉ. धनंजय जाधव, दिनेश अगरवाल, सिद्धिविनायक व अष्टविनायक मित्र मंडळ (माजी सैनिक नगर), चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट, स्वराज्य संघटना, युवा सोशल फाऊंडेशन, लोकविकास संघटना, विश्रांतवाडी ट्रक-टेम्पो चालक मालक संघ, माता जिजाऊ प्रतिष्ठान, जाणता राजा प्रतिष्ठाण, शशिआण्णा टिंगरे सोशल फाऊंडेशन, कमल फाऊंडेशन, चंद्रकांत जंजिरे प्रतिष्ठान, नवजीवन तरुण मंडळ, दान प्रतिष्ठान, हंस फाउंडेशन इत्यादी सामाजिक संस्था, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस आय, आरपीआय आदी राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींच्या वतीने वारकऱ्यांसाठी फराळ, छत्र्या-बॅगा-चपला दुरुस्ती, आरोग्य तपासणी शिबीर, औषधोपचार, अन्नदान, पाण्याच्या बाटल्या, फळे व बिस्कीट वाटप इत्यादी उपक्रम घेण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.