नवी दिल्ली -एवढ्या कमी कालावधीत राष्ट्रीय पक्ष? हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला. देशातील जनतेने आम्हाला इथपर्यंत पोहचवले. जनतेच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आता जनतेने आमच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे.
ती चांगल्या प्रकारे निभावण्यासाठी आशीर्वाद देण्याची प्रार्थना मी ईश्वराकडे करतो, अशी भावनाही त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केली. आपची स्थापना नोव्हेंबर 2012 मध्ये झाली. तो पक्ष अस्तित्वात येऊन अवघी 10 वर्षे आणि काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अशात त्या पक्षाने राष्ट्रीय दर्जा मिळवण्यापर्यंत मजल मारली. दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांत आप स्वबळावर सत्तेत आहे.