नागपूर : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते.
#मुंबई महाराष्ट्राचीच…. मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही. यासंदर्भातील सभागृहाच्या भावना कर्नाटक सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी विधानसभेत दिली.#हिवाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/Oxm5eCg2jh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 28, 2022
केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत, सभागृह याचा निषेध करित आहे.
शिक्षकांची रिक्त पदांची समस्या सुटणार; शालेय शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती
याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.