नवी दिल्ली – केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ या नव्या भरती योजनेबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. संतप्त जमाव यूपीपासून बिहारपर्यंत गोंधळ घालत आहे. निदर्शनादरम्यान आंदोलकांनी अनेक गाड्यांना लक्ष्य केले आहे. या गोंधळामुळे एकूण 200 रेल्वे सेवाही प्रभावित झाल्या आहेत. दुसरीकडे, सगळा प्रकार पाहता, रेल्वेने देशभरातील 35 ट्रेन सेवा रद्द केल्या आहेत.
या निदर्शनामुळे रेल्वेचे किती नुकसान झाले आहे हे सध्या सांगणे कठीण असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या तीन चालत्या गाड्यांचे डबे खराब झाले आहेत. त्याचवेळी आज सकाळी बिहारमधील समस्तीपूर आणि लखीसरायमध्ये रेल्वेला आग लावण्यात आली. अनेक एसी डब्यांनाही आग लागली.
#AgnipathRecruitmentScheme | A total of 200 train services have been affected due to the ongoing agitation; 35 train services stand cancelled while 13 have been short terminated, throughout the country.
— ANI (@ANI) June 17, 2022
ट्रेन थांबली
सैन्य भरतीसाठी आणलेल्या नवीन योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांनी आज पहाटे हावडा-दिल्ली मार्गावरील डुमराव स्टेशनजवळ गाड्या रोखल्या. आरा येथील बिहियाजवळ गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली.
उग्र निदर्शनामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाड्यांची वाट पाहण्यात त्रास होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12424 गुवाहाटी राजधानी, 15652 लोहित एक्स्प्रेस गाडी सोनपूर विभागातील बचवारा हाजीपूर रेल्वे मार्गाच्या मोहिउद्दीन नगर रेल्वे स्थानकावर पहाटे 5:00 वाजल्यापासून थांबली आहे.
याशिवाय 13554 वाराणसी आसनसोल मेमो, 13152 जम्मू तवी एक्सप्रेस, 12260 दुरंतो एक्सप्रेस, 12988 अजमेर सियाला एक्सप्रेस, 13009 दून एक्सप्रेस, 12307 जोधपूर एक्सप्रेस, 12321 मुंबई मेल, 12987 एक्सप्रेस सियालदह-जाखपुर स्टेशनच्या सियालदह-जाखपुर स्थानकावर थांबवण्यात आल्या
एकाचा मृत्यू
‘अग्निपथ योजने’ विरोधात सुरू असलेले आंदोलन आता उग्र बनत चालले आहे. बिहारपासून तेलंगणापर्यंत लोक या योजनेला विरोध करताना दिसत आहेत. तेलंगणातील सिकंदराबाद येथे निदर्शनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला.