मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडोमोडी घडताना पहायला मिळत आहेत. दरम्यान, या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत महाविकास आघाडी सरकार आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आठ दिवसांपूर्वी वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना, “सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं”, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. अगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु असून आता शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.
पुढे बोलताना,”सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो. गुन्हेगारीचं साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलल वाढून सामान्य मुंबईकरांच्या उंबऱ्यापर्यंत पोहचली आहे. तुम्हीही मुंबईचे रहिवाशी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एक दिवस ओलांडणारच होती. आता तस झालं आहे. गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवासस्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेले वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं आहे. १७ जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. ४० वर्षीय युवकाचा बळी केला. त्या कटुंबांनी फोडलेल्या टाहोने संबंध मुंबईचं काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथं भेट देऊन विचारपुस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले असल्याचा आरोप नितेश राणेंनी यावेळी केला.
सत्तेची लालसा, अधिक मतांची लालसा जिवघेणी ठरते आहे. मुंबईबाहेरील लोकांनाच्या मतांच्या लोभात अनाधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानी देतात. मुबईत १४ फुटाच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहर नजर असल्यानं ही बांधकामं राजरोज सुरु आहेत. अनाधिकृत बांधकामं वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहचली आहेत. त्यामुळं जेवाशी खेळ करत तिथं दोन दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. वारंवार अनाधिकृत बांधकामं ढासळत आहेत. यात लोकांचा जीव बळी जातोय. आपण मात्र शांतेत हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्यानं पाहत आहात. यामुळं निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्याची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे.