पाटणा : बिहारमध्ये रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. पहाटे 4 ते रात्री 8 या वेळेत कोणतीही ट्रेन धावणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये सर्वाधिक हिंसाचार झाला आहे. संतप्त जमावाने डझनभर गाड्या पेटवल्या आणि अनेक शहरे आणि गावांमधील सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले आहे.
रेल्वे अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेच्या मालमत्तेच्या झालेले तोडफोडीमुळे एकट्या बिहारमध्ये 200 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.
दुसरीकडे हिंसक आंदोलनांमुळे पूर्व मध्य रेल्वेने गाड्यांच्या संचलनात तात्पुरते बदल केले आहेत. रेल्वेने सांगितले की, हिंसक आंदोलनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातून इतर विभागीय रेल्वेच्या संचालनात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षितता लक्षात घेऊन, 18 जून रोजी रात्री 8 ते 19 जून रोजी पहाटे 4 आणि पुन्हा 19 जून रात्री 8 ते 20 जून रोजी रात्री आठपर्यंत पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातून जाणाऱ्या / पोहोचणाऱ्या गाड्या धावतील.