आळंदी – विद्यार्थी जीवनात एक आदर्श / यशस्वी होण्यासाठी व भविष्यात आपली ओळख निर्माण करण्यासाठी संस्काराची खूप आवश्यकता असते. आज त्याची कुठेतरी कमतरता जाणवते. विद्यार्थी सन्मार्गावरून भरकटत जात आहे त्यामुळे आदिम काळापासून आलेली आपली वैभवशाली गौरवपूर्ण भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून विद्यार्थी पुन्हा आपल्या सन्मार्गाचा वाटेवर कसा येईल, जेणेकरून तो एक चांगला माणूस म्हणून जगेन व तो स्वतःचा, परिवार, समाज व प्रामुख्याने देश व संपूर्ण सृष्टीचा विकास होईल.
यासाठी प्रकाश काळे यांच्या संकल्पनेतून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नवीन वर्षात इयत्ता आठवीच्या मुलांसाठी ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतिब्रह्म ह. भ. प. मारुती महाराज कुरेकर (अध्यापक – वारकरी शिक्षण संस्था) व ह. भ. प. अभय टिळक (विश्वस्त – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान) यांच्या प्रमुख उपस्थितीत ह. भ. प. नाना महाराज चंदिले (सचिव – वारकरी शिक्षण संस्था) यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी देवेंद्र बुट्टे पाटील (अध्यक्ष – खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, खेड), ह. भ. प. दत्तात्रय आबा गायकवाड (संस्थापक – नवजीवन शिक्षण संस्था, दिघी), गायकवाड सर (मुख्याध्यापक – सयाजीनाथ विद्यालय), ह. भ. प. तुकाराम गवारे (सचिव – इंद्रायणी शिक्षण संस्था, मोई), छाया लाटे (मुख्याध्यापिका – श्री केशवराज शिक्षण संस्था, मरकळ), डॉ. हंसराज थोरात (प्राचार्य, शरदचंद्र पवार महाविद्यालय, डुडुळगाव), ज्ञानेश्वर वीर (व्यवस्थापक – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान), श्रीधर सरनाईक, विलास वाघमारे, विश्वंभर पाटील, सोपान काळे, वेदमूर्ती निखिल प्रसादे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, प्रकाश काळे (विश्वस्त ज्ञा. शि. सं. व अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती), सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दिपक पाटील, विस्वस्त लक्ष्मण घुंडरे, सदस्य अनिल वडगावकर, पत्रकार महादेव पाखरे, भानुदास पऱ्हाड, दिनेश कुऱ्हाडे, श्रीकांत बोरावके, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, प्रा. श्रीधर घुंडरे, ह. भ. प. भागवत महाराज साळुंके, ह. भ. प. उमेश महाराज बागडे, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
अजित वडगावकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून ज्ञान मंदिरात ज्ञानदानाचे कार्य करत असताना अध्यात्म ज्ञानाची जोड मिळावी म्हणून ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमाविषयी माहिती दिली. विद्यार्थी मनोगतात दुर्गा तावरे व पालक वैशाली काळे यांनी ज्ञानार्जन करत असताना ज्ञानेश्वरी ची ओळख या उपक्रमांतर्गत संस्कार प्राप्त करण्याचा मार्ग व संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे व चरित्र समितीचे आभार व्यक्त केले. प्रकाश काळे यांनी ज्ञानेश्वरी हे जीवन ग्रंथ रुपी अमृत मानवी जीवनात जनसामान्यांना देण्याचा हेतू, जीवन जगण्याची कला, अध्यात्मिक बैठक तयार करावयाची असेल तर अशा उपक्रमाची आवश्यकता याविषयी आपले विचार व्यक्त केले.
यानंतर मारुती म. कुरेकर, नाना म. चंदिले, सुरेश वडगावकर, अभय टिळक, देवेंद्र बुट्टे, भागवत म. साळुंके, हंसराज थोरात, दत्तात्रय गायकवाड, छाया लाटे, गायकवाड सर यांनी भारत भूमीस मिळालेले रत्न व ज्ञानेश्वरी रूपी धन जनसामान्यांना वाटणे, ज्ञानेश्वरीच्या शब्दावर बोट ठेवण्याचे परमभाग्य, ज्ञानेश्वरांचे हृदय अभ्यासण्याचा योग, मूल्यांची ओळख, जगाच्या कल्याणासाठी असे बीज पुरवण्याची गरज तसेच ज्ञानेश्वरीची ओळख या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या व हा कार्यक्रम फक्त श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतच नाहीतर भारत देशाच्या बाहेर घेऊन जाण्याची मनसा याविषयी आपले विचार व्यक्त केले. उपस्थितांचे आभार प्राचार्य दिपक मुंगसे यांनी व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुज्यायिनी राजहंस व हेमांगी कारंजकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.