राजगुरूनगर -बैलगाडा शर्यती या लोकभावनेचा विषय असून लोकांची यावर श्रद्धा आहे. यासाठी जन आंदोलन उभे झाले तरच सरकारला शेतकरी आणि जनतेच्या अस्मितेच्या
बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी जाग येईल. शिवसेना या आंदोलनात पुढे असेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राजगुरुनगर येथे शिवसेना मेळाव्यानंतर एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते रविंद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख माऊली कटके, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, विजयाताई शिंदे आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
न्यायालयाची बंदी असताना कायदा मोडून शिवसेना बैलगाड्याच्या शर्यतीवर बोलत असल्याचे विचारले असता खासदार राऊत म्हणाले, कायदा न मोडता जन आंदोलन करणे म्हणजे लोकभावनेचा विचार सरकारने केलाच पाहिजे.
12 आमदारांची राज्यपालांना पाठवण्यात आलेली यादीत नाव वगळल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत खा. संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणतेही नाव वगळले नसल्याचे स्टेंटमेंट दिले आहे. राज्यपाल हे पॉलिटिकल एजंट आहे. राज्यपाल हे तटस्थ असले तरी ते अगोदर केंद्रात मंत्री, एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य, प्रचारक होते.
त्यामुळे केंद्रांचे घटनात्मक पदावर जरी असले तरी ते केंद्रात गव्हर्मेट अँडव्हायझर हे पद आहे. ब्रिटीश काळात गव्हर्नर एजंट असाच शब्दप्रयोग करण्यात आल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी करून राज्यपाल हे सरळमार्गी आहेत. त्यांच्याबद्दल आदर प्रेम आहे; तरी गाडीला ब्रेक लावला जातोय पण सरकारचे काम योग्य दिशेने सुरू आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत राऊत म्हणाले, सर्व पक्ष एकत्र आले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या विषयावर एकत्र येऊन चर्चा करत असून ओबीसी आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय होईल.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेल्या कारवाई मुळे मंत्र्यांना ईडीच्या नोटीसा येत आहे का, या प्रश्नावर राऊत म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे आहेत, हे केंद्र सरकारला माहित आहे. चुकीची कारवाई झाली नाही. कायद्यानुसार नारायण राणे यांच्यावर कारवाई झाली आहे.
त्यांच्याबाबत स्थानिक नेते निर्णय घेतील
राज्यात महाआघाडी सरकार असताना खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या राजकीय घडामोडीत आमदार मोहिते यांचे कान टोचले. त्यांनी राजकीय खेळी केली असली तरी एकाच मातीत आपल्या माणसांबद्दल वैर बाळगणे कोणत्या माणुसकीला धरुन आहे.
आमदार गोरे यांच्या निधनानंतर वैर ठेवून पंचायत समितीची इमारतीला मंजूर झालेला निधी उपलब्ध असताना केलेले राजकारण योग्य नाही. मग यावर चर्चा कशाला आमदारांशी केली पाहिजे. राष्ट्रवादीशी कोणतेही भांडण नाही.
आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही. तालुक्यात शिवसेना बॅकफूटवर नसून योग्य वेळी संघर्ष करुच आम्ही ठरवू तेच करुन दाखवणारी आहे. या तालुक्यातील जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी स्थानिक पातळीवर निर्णय घेतील.