नवी दिल्ली – हॉलमार्कीग बंधनकारक करण्याविरोधात देशातील काही दागिने उत्पादक संघटनांनी सोमवारी संप करण्याचे आवाहन केले होते. या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दागिने उत्पादकाच्या परिषदेने म्हटले आहे.
परिषदेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सरकारने हॉलमार्कीग बंधनकारक केले असले तरी त्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. त्याचबरोबर हॉलमार्किंग पद्धतीमुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळते असे सरकार म्हणत असले तरी यामध्ये फारसे तथ्य नाही.
हॉलमार्किंगच्या माध्यमातून दागिने उत्पादकाचे ट्रेकिंग केले जाते असे परिषदेला वाटते.
मात्र या संपाला दागिने उत्पादकानी फारसा प्रतिसाद न दिल्याचे सरकारने म्हटले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फारच कमी दागिने उत्पादकांनी संपाला पाठिंबा दिला.
मुळात फारच कमी दागिने उत्पादकांनी संपाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील दागिने उत्पादकाची दिशाभूल करण्यात येत आहे. हॉल मार्कीगलाला देशातील दागिने उत्पादकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दागिने उत्पादनाबरोबरच ग्राहकांचा फायदा होतो.
मात्र या दागिने उत्पादकांची काहीजण दिशाभूल करीत आहेत असे सरकारने म्हटले आहे. तनिष्क, कल्याण ज्वेलर्स, मलबार गोल्ड या शृंखलांची दुकाने सोमवारी चालू होती. देशात मोठ्या प्रमाणात दागिने विकले जातात.
दागिन्यांतील सोन्याची शुद्धता निश्चित व्हावी याकरिता हा उपक्रम सरकारने राबविला असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. उत्पादकांनी या कामात काही अडचणी येत असतील तर त्या सांगाव्यात, त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही ग्राहक व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.