पुणे, सहकार नगर – श्री संकल्प फाउंडेशन पद्मावती पुणे यांच्या वतीने तळजाई टेकडी येथे
वृक्षांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. तसेच वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी देशी पिंपळ, बकुळ, वड, अश्या एकूण पन्नास वृक्षांचा समावेश वृक्षरोपन मध्ये होता.
सर्व वृक्ष हि साधारणतः 4 वर्ष पूर्ण झालेली लावण्यात आली. तसेच रक्षाबंधन निमित्त लावलेल्या झाडाची काळजी घेऊ ,रक्षा करू म्हणून शपथ घेऊन प्रतीकात्मक स्वरूपात वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
तसेच वृक्षाना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला .ह्या वेळी संकल्प फौंडेशन चे अध्यक्ष गणेश गांधी म्हणाले कि वृक्षाना राखी बांधून आज त्यांची रक्षा मानवा कडून करणे त्यांची निगा राखणे ,संगोपन करणे गरजेचे आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणे करून भविष्यात हेच वृक्ष आपल्या पुढील पिढी साठी जगण्या साठी प्राण वायू देऊ शकतील व नैसर्गिक संतुलन राहील.
ह्या कार्यक्रमास नीलम गांधी, मदन कुलकर्णी, राकेश चव्हाण, साई प्रसाद कसबे, केतन काकडे, अजय सुपेकर, अक्षय धर्मपाल, निखिल रांजणे, देवराज लाडके पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.