वाघोली (पुणे) – आपल्या कुटुंबाला पुढे नेणारी एक महिला ज्याप्रमाणे घराला सक्षम करू शकते, स्वतः स्वावलंबी होऊ शकते, त्याचप्रमाणे आपल्या गावाच्या विकासामध्ये सहभागी होऊन देखील हीच महिला गावाला देखील विकासाच्या उंबरठ्यावर नेऊ शकते एवढा विश्वास महिलांमध्ये आहे. याकामी महिलांना सन्मानाची वागणूक तसेच वेळोवेळी समाजाकडून पाठबळ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वाघोली गावाच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
वाघोली येथे ग्रामस्थांच्या वतीने अष्टापूर गावच्या सरपंचपदी कविता योगेश जगताप यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.. यावेळी त्या बोलत होत्या. वाघोली ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांच्या हस्ते कविता जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवती कॉंगेसच्या जिल्हा उपाध्यक्षा पूजा अडसरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश जगताप आदी उपस्थित होते.