नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केरळ राज्यातील कोचिन येथे विविध योजनांचे उद्घाटन केल्यानंतर म्हटले की, जे कार्य आज सुरू केले जात आहे, ते विविध प्रकारच्या क्षेत्रांतील आहे आणि यामुळे भारताच्या आर्थिक वृद्धीला बळ मिळेल.
कोचिनमध्ये बीपीसीएल सुरू झाल्यामुळे विदेशी चलनाची बचत होणार आहे. विविध प्रकारच्या उद्योगांना फायदा होणार आहे. तसेच नव्या रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले की, भारतातील प्रत्येक गावांत ब्रॉडबॅंडची सुविधा पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
कोचिन येथे अनेक विकास योजनांचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने पर्यटन क्षेत्रात मागील पाच वर्षांत चांगली वृद्धी केली आहे. जागतिक पर्यटन सूचीमध्ये देश 65व्या स्थानावरून 34व्या स्थानावर पोहोचला आहे.
आपण येथे केरळ आणि भारताच्या विकासाचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आज अनेक क्षेत्रांमध्ये विकास कामांचे उद्घाटन होत आहे. यामुळे भारताच्या विकासाला ऊर्जा मिळेल.