नवी दिल्ली : देशातील नागरी वस्तीत नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी आणि त्यासाठीच्या योंजना अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारने या आधीच जलजीवन योंजना सुरू केली आहे. त्या योजनेसाठी 2 लाख 87 हजार कोटी रूपयांचा आराखडा केंद्र सरकारने तयार केला आहे. त्यातून 4378 स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी पुरवला जाणार आहे.
स्वच्छ भारत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही 1 लाख 41 हजार 678 कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून तो पुढील पाच वर्षासाठी आहे. हा आराखडा जाहीर करण्यात आला असला तरी त्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात नेमकी किती रूपयांची तरतूद करण्यात आली आहे याचा मात्र उलगडा झालेला नाही. उत्त्पादन वाढवण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड बोनस दिला जाणार असून त्यासाठी पुढील पाच वर्षात 1 लाख 97 हजार कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.