राजगुरूनगर (पुणे) – खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी राजगुरूनगर येथे पंचायत समितीच्या आवारात गुरुवारी (दि. 12) धरणे आंदोलन करून बेमुदत धरणे व कामबंद आंदोलन केले. तर प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर पुकारलेले कामबंद आंदोलन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मागे घेतले.
गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्यासमवेत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संपत तांबे, तालुकाध्यक्ष विजय बवले, कार्याध्यक्ष राजेंद्र काळी, महिला अध्यक्षा योगिता ठाकूर, उपाध्यक्ष अरुणा जाधव, सतीश मसुडगे, सचिव हरी रौधंळ, पोपट गाडे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुरेश घनवट, देविदास आतार, सचिव निलेश पांडे, रामदास शिंदे यांच्यासमवेत झालेल्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात येऊन मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा विविध मागण्या सोडवण्यात येणार असल्याची भूमिका गटविकास अधिकारी अजय जोशी घेतल्याने कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन मागे घेऊन धरणे आंदोलन सोडले.
- या मागण्या…
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मागण्याबाबत निवेदनानुसार
किमान वेतनातील फरक मिळणे
राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीतील हिस्सा जमा करणे
दिवाळी बोनस मिळणे
गणवेश मिळणे
सेवा पुस्तक अद्यावत करणे,
ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी प्रवास भत्ता मिळणे,
ओळखपत्र मिळणे