जळोची (पुणे) – अनिल देशमुख यांच्या घरावर १०९ वेळा छापा मारला गेला आहे. त्यातच ९५ टक्के कारवाया या विरोधी पक्षावर बदला घेण्यासाठी या संस्थांचा वापर केला जातो आहे हे दर्दैवी आहे. तसेच संविधान विरोधात आहे. याविषयी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे प्रतिपादन बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
बारामती येथील एका कार्यक्रमानिमित सुप्रिया सुळे आल्या होत्या, यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुळे बोलत होत्या.
इडी आणि सीबीआयची रेड होणार आहे हे आधी कसे कळते. हे आधी कळत असेल तर या राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यावर अमित शहा यांनी कमिटी नेमली पाहिजे. आणि देशाला उत्तर दिले पाहिजे की या लिकेजेस कशा होतात.
संजय राऊत यांच्या केसची ऑर्डर बघा. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा आरोप केला आणि आता 1 कोटीचा आरोप आहे.. मग 99 कोटींचे काय झालं? आरोप करायचा आणि पळून जायचे ही भारतीय संस्कृती नाही. सत्तेचा गैरवापर करून लोकांना भीती दाखवत असाल तर ती महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचेहि सुळे म्हणाल्या.
दरम्यान, संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई हि सूडबुद्धीने केली आहे. त्यातच ईडी आणि सीबाआई ने एकच कुटुंबावर केलेली कारवाई हि या विरोधी पक्षावर बदला घेण्यासाठीच केली जात असल्याचे आरोप हि सुळे यांनी केले आहेत.