पुणे – जिल्ह्यातील 13 ही तालुक्यांमध्ये बाहेरगावावरून आलेल्यांमुळे करोनाबाधितांची संख्या वाढत होती. यातील अनेकांनी शासनाच्या आवाहनानुसार स्वत:ला क्वारंटाइन करून घेतल्याने गावात इतरत्र संसर्ग पसरला नाही. तर जे लपूनछपून आले होते त्यांच्यामुळे गावात करोनाचा फैलाव झला होता.
मात्र, प्रशासनाने त्वरीत कडक पावले उचलल्याने गावात बाधितांचा आकडा वाढण्यास अटकाव झाला. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या घटत असल्याने ही दिलासादायक बाब असली तरी यातून हुरुळू न जाता काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.