मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात सार्वधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे मुबंईत ५३ पत्रकारांची कोरोना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिकेने १६८ पत्रकारांची कोरोना चाचणी केली होती.
त्यापैकी ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. किरीट सोमय्या ट्वीटमध्ये लिहले आहे कि, मुंबई महापालिकेने, टीव्ही इलेक्ट्रॉनिक जर्नलिस्ट असोसिएशनच्या विशेष शिबिरामध्ये १६८ पत्रकारांची चाचणी केली होती. त्यापैकी ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचं एकूण धक्का बसला.
Shocking to hear 53 of 168 Journalist's tested for Corona, found Positive in Special camp of Mumbai BMC & TV Electronic Journalist Association. I request Maharashtra Govt & TV Channel Owners to take steps/support their full Treatments. Also get them Insurance Cover @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 20, 2020
मी राज्य सरकार आणि माध्यमांच्या मालकांना विनंती करतो कि, पत्रकारांच्या उपचारासाठी रुग्णालयांचा खर्च उचलावा. तसेच पत्रकारांना विमा संरक्षण द्यावे असं किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान, राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांनी काळजी घ्यावी असं आवाहन केले आहे. ५३ पत्रकारांना कोरोनाचे संक्रमण होणे हे गंभीर प्रकरण आहे. कोरोनाच्या लढाईत आपण महत्वाचे सैनिक आहोत. जेव्हडी बातमी महत्वाची आहे तेव्हढे बातमीदारही महत्वाचे आहेत असं ट्विट त्यांनी केले आहे.
५३ पत्रकारांना कोरोनाची लागण होणे हे गंभीर आहे.पत्रकार मित्र मैत्रिणींनी विशेषत: field वरील पत्रकारांनी काळजी घ्यावी.या कोरोना विरुद्धच्या लढाईतले आपण महत्वाचे सैनिक आहात.बातमी जितकी महत्त्वाची आहे तितकाच बातमीदारही. pic.twitter.com/2OaZaELrb6
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 20, 2020