अन्न टंचाईचा प्रश्न मी पक्षीय दृष्टिकोनातून सोडविणार नाही – चव्हाण
अकोला, दि. 15 – अन्नटंचाई व बेकारी हे प्रश्न सोडविताना पक्षीय दृष्टिकोन आड येऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, असले गंभीर प्रश्न सोडविताना सामुदायिक शहाणपणा उपयोगी पडतो, पक्षीय अभिनिवेश नव्हे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, केंद्राकडून 20 हजार टन अन्नधान्य राज्याला मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील अन्न परिस्थिती पुष्कळच सुधारेल. यापुढे धान्यवाटप करताना प्रथम दुष्काळग्रस्त आदिवासी व रोजगार हमी योजनेखालील कामगार यांना धान्य पुरविण्यात येईल. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची मी
गय करणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.काश्मीर कराराने म्हणे तणाव वाढेल!
नवी दिल्ली – काश्मीर प्रश्नांवर काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित असा अंतिम तोडगा काढण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्या वाटाघाटी “योग्य वेळी’ सुरू होऊ शकतील, असे उद्गार पाकिस्तानचे पंतप्रधान भुट्टो यांनी काढले. कराची येथे रुमानियाचे अध्यक्ष सिऊसेक्यू यांच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीप्रसंगी भुट्टो पुढे म्हणाले की, भारत सरकार व शेख अब्दुल्ला यांच्यात काश्मीरसंबंधी झालेल्या करारामुळे काश्मीरमधील तणाव वाढेल. दोन व्यक्तींमधील राजकीय व्यवहार व नियमबाह्य तोडगा काश्मिरी जनतेला व पाकिस्तानी जनतेला मान्य होणार नाही, असेही भुट्टो म्हणाले.