भारत-पाक दरम्यान लवकरच चर्चा
नवी दिल्ली, दि. 27 – उभय देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करणे, रेल्वे, रस्ते, हवाईमार्गे वाहतूक सुरू करणे व एकमेकांच्या प्रदेशांवरून उड्डाणे करणे यासाठी भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान करारविषयक बोलणी लवकरच होईल. आंतरराष्ट्रीय नागरी पर्यटन संघटनेपुढील केस काढून घेण्यास पाकिस्तानने नाखुशी दर्शविल्याने गेल्यावर्षी करार होऊ शकला नाही.
पाकचे पंतप्रधान भुट्टो यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुन्हा अधिकारी स्तरावर बोलणी करण्याचे आवाहन करण्यात आले. भुट्टो यांनी यास प्रतिसाद दिला आहे. आंतरराष्ट्रीय नागरी पर्यटन संघटनेकडील केस काढून घेण्यास पाकिस्तान तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
55 टक्के भूमिहिनांना घरांसाठी जमीन वाटप
नवी दिल्ली – देशाच्या ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजुरांपैकी 55 टक्क्यांहून अधिक लोकांना घरांसाठी जमिनी देण्यात आल्या आहेत. 61.13 लाख कुटुंबांना जमिनी दिलेल्या आहेत. याबाबतीत पहिला क्रमांक गुजरातचा लागतो तेथे 22.45 लाखांहून अधिक जागा अशा लोकांना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ही संख्या 5.36 लाख आहे.
शिक्षण यंत्रणेची छाननी करावी
नवी दिल्ली – देशातील सध्याच्या शिक्षण यंत्रणेची मूलभूत छाननी करण्यात यावी अशी सूचना आज संसदेत अनेक सदस्यांनी केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यासाठी निर्धारपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत.