संततिनियमन हवे पण सक्ती नको
पॅरिस, दि. 19 – भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले, प्रभावी संततिनियमन अवलंबिल्याखेरीज भारताची प्रगती होणे शक्य नाही. मात्र हे संततिनियमन खुशीने असले पाहिजे. सक्तीचे असता कामा नये. पंतप्रधान मोरारजी पुढे म्हणाले, भारताला प्रादेक्षिक महत्त्वाकांक्षा नाही. बलाढ्य राष्ट्रात आमची गणना व्हावी असे आम्हास वाटत नाही. पंतप्रधान मोरारजी पुढे म्हणाले, देश रक्षणासाठी जरूर तेवढे लष्करी सामर्थ्य असले म्हणजे पुरे आणि तेसुद्धा स्वयंपूर्ण लष्करी सामर्थ्य हवे. ग्रामीण उद्योग धंद्यावर रोजगारांसाठी आम्ही भर देणार आहोत.
नेपाळात लोकशाही स्थापन करा
नवी दिल्ली – नेपाळी कॉंग्रेसचे नेते शशी शुमशेरे यांनी नेपाळात लोकशाही स्थापन करावी, असे आवाहन राजे वीरेंद्र यांना केले आहे. शुमशेरे हे गेली 18 महिने भारतात वास्तव्य करून आहेत. सर्व राजकीय कैद्यांना मुक्त करा. नेपाळातून बाहेर घालविण्यात आलेल्यांना व कार्यकर्त्यांना मायदेशी परत येण्यास परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली.
आयुवैदिक उपचारांना उत्तेजन देऊ
नवी दिल्ली – आयुर्वेदाला व आयुर्वेदीय उपचार पद्धतीला आपण उत्तेजन दिले पाहिजे, त्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धतीला उत्तेजन देऊ, असे गृहमंत्री चरणसिंग यांनी सांगितले.