लग्नासाठी मुलींची किमान वयोमर्यादा 18 होणार, मुलांची 21
नवी दिल्ली, दि. 16 – मुलींच्या लग्नाची किमान वयोमर्यादा 15 वरून 18 वर्षांपर्यंत, तर मुलांच्या लग्नाची किमान वयोमर्यादा 18 वरून 21 वर्षांवर नेण्याचे सरकारने निश्चित केले असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब नियोजनमंत्री डॉ. करणसिंह यांनी सांगितले. लग्नाची किमान वयोमर्यादा ठरविण्यासाठी योग्य तो कायदा करण्यात येईल. यासाठी शारदा कायद्यात सुधारणा करण्यात येईल. लग्नाची नोंदणी करण्याची सक्ती करण्यावर विचार चालू आहे.
1971ची लोकसंख्या प्रमाणभूत
1971ची लोकसंख्या प्रमाण मानून लोकसभा व विधानसभा या दोन्ही सभागृहातील प्रतिनिधित्व दिले जाईल. 2001 सालापर्यंत हे प्रमाण गोठवून ठेवले जाईल. यासाठी घटनेत जरूर ती दुरुस्ती चालू वर्षीच
करण्यात येईल.
राजदूत नियुक्तीचे स्वागत
टोकियो – गेल्या 15 वर्षांच्या खंडानंतर भारताने पेकिंगमध्ये राजदूताची नेमणूक करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पेकिंगमध्ये स्वागत झाले, असे क्योटो वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भारताचा हा निर्णय म्हणजे आशियातील दीर्घकाळ रेंगाळलेला राजकीय प्रश्न सोडविणे होय. मात्र चीनची वृत्तसंस्था पेकिंग रेडियो भारताच्या कृतीवर अजून मौन बाळगून आहे.