ग्राहक सहकारी चळवळ बलशाली झाली पाहिजे
म्हैसूर, दि. 3 – पाचव्या योजनेअखेर सहकारी संस्थांमार्फत 600 कोटी रुपयांचा किरकोळ व्यापार हाताळण्याचे उद्दिष्ट आहे. हे पुरे होण्यासाठी ग्राहक सहकारी चळवळीमधील कमतरता भरून काढून ती चळवळ बलशाली होण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार केंद्रीय उद्योग व नागरी पुरवठामंत्री टी. ए. पै
यांनी काढले.
उपग्रहाच्या हिंद-रशिया वाटाघाटी
बंगलोर – भारतीय बनावटीचा पहिला शास्त्रीय उपग्रह एप्रिलमध्ये अंतराळात सोडण्यात येणार आहे. त्यासंबंधी या महिन्याच्या मध्यास रशिया व भारत यांच्यात येथे वाटाघाटी होणार आहेत. 11 वा 12 तारखेला रशियन अंतराळ तज्ज्ञांचे एक मंडळ येथे येईल.
भौतिकवाद व अध्यात्म यांचा समन्वय साधावा
गोहत्ती – भौतिकवाद व अध्यात्म यांच्यात अर्थपूर्ण समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आज राष्ट्रपती अहमद यांनी गोहत्ती विद्यापीठात खास पदवीदान समारंभप्रसंगी भाषण करताना सांगितले. ते पुढे म्हणाले, देशात क्रीडा क्षेत्राचा विकास होण्यासाठी, क्रीडा विश्वात भारताला मानाचे स्थान प्राप्त होण्यासाठी राष्ट्रीय धोरण अंमलात आणणे आवश्यक आहे.
अरबांवर हल्ला कराल तर खबरदार
मॉस्को – इस्रायलने जर अरबांवर पुन्हा हल्ला केला तर तेल अवीव वाचणे फार कठीण होईल, असा इशारा रशियन परराष्ट्रमंत्री ग्रोनिको यांनी दिला आहे.