बांगलादेशीय निर्वासित वाढले
कलकत्ता, दि. 24 – बांगलादेशातून भारतात येणाऱ्या निर्वासितांची संख्या गेल्या वर्षाच्या मानाने अधिक असल्याचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी सांगितले.
बांगलादेशातून नुकत्याच आलेल्या निर्वासितांसंबंधी आपण केंद्रीय गृहमंत्री चरणसिंग यांच्याशी चर्चा केल्याचे बासू यांनी सांगितले. बांगला देशातून चालू वर्षी निर्वासित आले नाहीत, या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालाबाबतही त्यांनी चरणसिंग यांच्यासोबत चर्चा केली.
चार हजार वर्षांपूर्वीचे बांधकाम सापडले
उज्जैन – मदसौर जिल्ह्यात भानपुरा गावानजिक सुमारे चार हजार वर्षांचे दगडी बांधकाम येथील तीन तरुण शिक्षकांनी शोधून काढले आहे. या ठिकाणी दगडांवर बैल, हरणे, बारशिंगे व गेंडा यांची चित्रे कोरलेली आहेत.
जकात रद्दचा विचार
नवी दिल्ली – जकातीमुळे रस्त्यावरील मालवाहतुकीस दिरंगाई होते. जकात रद्द करण्यावर केंद्र सरकार विविध अंगांनी विचार करीत आहे, असे मंत्री चांदराम म्हणाले