नवी दिल्ली – भारतातील लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत ज्या नागरीकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे त्यांना त्या संबंधात जे सर्टिफिकेट दिले जाते त्याला जगातल्या 108 देशांनी आत्तापर्यंत मान्यता दिली आहे अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज लोकसभेत दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने ज्या लसींना मान्यता दिली आहे त्याच लसींद्वारे हे लसीकरण करण्यात आले असून ते पुर्ण सुरक्षित आणि परिणामकारक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या लसींच्या संबंधात जगातील देशांना त्यांच्या नियमानुसार मान्यता देण्याची मूभा भारत सरकारने दिली आहे.
तथापि जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लसींचाच भारतात वापर झाल्याने असे लसीकरण झालेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासही त्वरीत मान्यता मिळते असे त्या म्हणाल्या.