पुणे : हिंगणघाट आणि औरंगाबद येथील तरुणींनी रॉकेल ओतून पेटवून देण्याच्या दोन गंभीर घटनांच्या निषेधार्थ रुग्ण हक्क परिषद पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या दोन्ही घटनांमधील पिडीतेला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.तसेच राज्यात अशा घटना वाढत असताना, सरकारला त्या रोखण्यात अपयश येत असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
परिषदेच्या पुणे जिल्हाअध्यक्ष तेजश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात, परिषदेचे हरेश गोठे, रफीक शेख, सी.एन. सरवदे, कोमल हिंगणे, जयप्रकाश गावडे, स्वाती भोसले, सुधा पैय्यावळ, जितेंद्र वांद्रेकर, अजय कदम, जयराज वाघमारे, विजय गायकवाड, नरेश भोसले, समीर वाल्हेकर यावेळी उपस्थित होते.