मुंबई – धनंजय मुंडेंसारखे लोक राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. काल त्यांनी कोणताही संबंध नसताना मराठा आरक्षणाचा विषय काढून निवडणुकीला जातीय रंग देण्याचे काम केले.
यामु्ळे ते भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पाडण्याचा डाव आखत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केली आहे.
बीड मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ओबीसीचा दाखला काढल्याचे दुःख धनंजय मुंडे यांना झाल्याचे दिसते. एवढी वर्षे त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणापासून दूर ठेवले.
यामुळे त्यांना राजकीय लाभ झाला. पण आता मराठा समाजाला मिळणारे ओबीसी आरक्षण त्यांना आवडत नसल्यामुळे ते त्रागा करत असून, आम्ही त्यांचा निषेध करतो, असेही वीरेंद्र पवार यावेळी बोलताना म्हणाले.