मुंबई – करोना विषाणूचे संकट अद्याप टळले नसल्याने राज्यात दहीहंडी उत्सवाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपनेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.
काहीतरी नियम घालून द्या, पण उत्सव सरसकट रद्द करु नका, असं राम कदम यांनी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्हाला नियमांबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्ही नियम पाळायला तयार आहोत. मात्र प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांमध्ये शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांची देखील ठाकरे सरकारने फसवणूक केल्याचा आरोप राम कदम यांनी केला. या संदर्भात त्यांनी ट्विटही केलय.
#दहीहंडी होणारच.. घरात बसुन सबुरीचे आम्हाला नकोत.. #बार उघडता त्यांना नियम लावता आणी हिन्दू सणांना विरोध ? आम्ही दहीहंडी करणारच .. pic.twitter.com/x1YB2512p3
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 23, 2021
राज्यातील दारुची दुकाने सुरू ठेवलेत. त्यासाठी जसे निमय लावले तसे दहिहंडीला नियम लावा. पण वातानुकुलीत बंगल्यात बसून तुम्ही दहिहंडी रद्द करणार असाल, तर हिंदू बांधव ऐकणार नाही, असा इशाराही कदम यांनी दिला.