मुंबई – राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असून 5 जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी सर्व जिल्हे आणि काही महापालिका यांचे स्वतंत्र प्रशासकीय गट करून त्यांची विभागणी 5 टप्प्यांमध्ये करण्यात आली.
त्यानुसार दर गुरुवारी जिल्हानिहाय नवीन आकडेवारी जाहीर करून त्यानुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार आज राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरमध्ये आहे. येत्या 14 जूनपासून म्हणजेच सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या टप्प्यांनुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी 5 गटांमध्ये करण्यात आली आहे. यासंदर्भात दर गुरुवारी आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या आकडेवारीनुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आपला जिल्हा किंवा त्यातील महापालिका कोणत्या गटात नव्याने वर्ग करता येतील, किंवा आहे त्याच गटात कायम राहतील किंवा आहे त्याच गटात कायम ठेऊन निर्बंध कठोर होतील, याविषयीचा निर्णय घेईल. नव्याने घेण्यात आलेले निर्णय ठरल्याप्रमाणे 14 जूनपासून म्हणजेच सोमवारपासून त्या-त्या जिल्ह्यात किंवा महापालिका क्षेत्रामध्ये लागू करण्यात येतील.
जिल्हानिहाय पॉझिटिव्हिटी रेट (10 जून)
पुणे – 11.11
अहमदनगर – 2.63
सातारा – 11.30
सांगली – 6.89
कोल्हापूर – 15.85
रायगड – 13.33
रत्नागिरी – 14.12
सिंधुदुर्ग – 11.89
सोलापूर – 3.43
ठाणे – 5.92
औरंगाबाद – 5.35
बीड – 5.22
अकोला – 5.37
अमरावती – 4.36
भंडारा – 1.22
बुलढाणा – 2.37
चंद्रपूर – 0.87
धुळे – 1.6
गडचिरोली – 5.55
गोंदिया – 0.83
हिंगोली – 1.20
जळगाव – 1.82
जालना – 1.44
लातूर – 2.43
मुंबई शहर आणि उपनगर – 4.40
नागपूर – 3.13
नांदेड – 1.19
नंदुरबार – 2.06
नाशिक – 7.12
उस्मानाबाद – 5.16
पालघर – 4.43
परभणी – 2.30
वर्धा – 2.05
वाशिम – 2.25
यवतमाळ – 2.91