मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. शिवाय ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. सध्या चाललेल्या राजकीय परिस्थितीवरून महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याच्या चर्चाना ऊत आला आहे. यातच संजय राऊत यांनी केलेल्या “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने..” असे ट्विट केल्यामुळे महविकास आघाडी सरकार मध्य नेत्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटल्याचे कळते आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
एकीकडे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सावधानतेने पावलं उचलली जात असताना दुसरीकडे संजय राऊत यांच्या ट्विट मुळे सरकार पडणार असल्याच्या शक्यता अधिक स्पष्ट झाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे अखेर संजय राऊतांनाही माध्यमांसमोर याविषयी स्पष्टीकरण द्यावं लागलं. जो काही निर्णय घेतला जाईल, तो आघाडी सरकार घेईल, असं त्यांना स्पष्ट सांगावं लागलं.
हा निर्णय आघाडी घेईल, मी फक्त माझं मत व्यक्त केलं
संजय राऊत यांना ट्विट संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘ मी फक्त मत व्यक्त केलं आहे. ज्या पद्धतीनं आमदारांची पळवापळवी.. दबावतंत्र, धमक्यांचं सत्र सुरू आहे. त्यामुळे सरकार अस्वस्थ आहेत. प्रमुख नेते अस्वस्थ आहेत. भविष्यात काय वळण घेईल हे आता कुणी सांगू शकत नाही. अशा स्थितीत तिथली विधानसभा बरखास्त करून पुढील निवडणुकांना सामोरं जाण्याचा पर्याय असतो. हा निर्णय आघाडी घेईल, मी फक्त माझं मत व्यक्त केलं. असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.