इस्लामाबाद – इशनिंदेच्या आरोपाखाली कट्टरवाद्यांकडून करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या नागरिकाच्या हत्येचे पाकिस्तानातील मंत्र्याने विनोदी पद्धतीने समर्थनच केले आहे. हा प्रकार म्हणजे काही अतिउत्साही युवकांनी दाखवलेला अतिफाजील उत्साह होता, असे आपत्तीजनक वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खट्टक यांनी केले आहे. अशाप्रकारचा अतिउत्साह नेहमीच दाखवला जातो, असेही खट्टक यांनी म्हटले आहे.
ती लहान मुल आहेत, ती जोशात येतात आणि उत्स्फूर्तपणे असे काम करून मोकळी होतात. याचा अर्थ ‘देश विनाशाच्या मार्गावर जात आहे’, असा होत नाही. प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत. इस्लाम विरोधी असल्याचं त्यानं घोषणा दिल्या. परंतु त्यांची प्रतिक्रिया उत्स्फुर्त होती, असेही ते म्हणाले.
या घटनेला जे रुप दिले जाते आहे. तसे काहीच नाही. मी देखील एखादी उत्स्फुर्त प्रतिक्रिया देऊ शकतो. परंतु सर्वकाही खराब झाले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. सियालकोटमध्ये झालेली घटना एक सामान्य घटना असल्याचेही ते म्हणाले आणि पाकिस्तानची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी सियालकोटमध्ये झालेल्या या घटनेवर जगभरातून तीव्र निषेध केला जातो आहे. इशनिंदेच्या आरोपातून करण्यात आलेल्या हत्येचे हे आणखीन एक उदाहरण म्हणून पुढे आले आहे.