कोरडगाव – कोरडगावसह परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीचा वेग मंदावला आहे. काही भागात एकच पाऊस झाल्याने आजपर्यंत पेरच झालेली नाही.
कोरडगाव, आगसखांड, शेकटे, टाकळी, वसूजळगाव, येळी भागात काहीअंशी कपाशी लागवड झाली आहे. परंतु पाऊस नसल्याने चाळीस टक्के बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. या कमी पावसाचा परिणाम कोरडगावच्या बाजारपेठेवर झाला आहे.
शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस नसल्यामुळे बरेचसे नुकसान होत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली पण आता साले वातावरण कोरडे आहे. मार्केटमध्ये मध्ये महागाई वाढली मागणी जास्त व पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे कृषिसंबंधित सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत.