गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले “आपण बोलत असताना….”

Chief Minister Devendra Fadnavis : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली आहे. या टीकेचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. जयंत पाटील यांच्या वाळवा मतदार संघातील त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पडळकरांच्या टीकेचा निषेध नोंदविला जात आहे. त्यांनी केलेल्या टीकेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले ते योग्य आहे असे माझे अजिबातच मत नाही. वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल बोलणे हे योग्य नाहीये. यासंदर्भात मी गोपीचंद पडळकरांसोबत बोललो आहे. अशाप्रकारच्या विधानांना आम्ही कधीच समर्थन करणार नाहीत, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. तसेच तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघत असतील याचा विचार करायला हवा, असा सल्ला गोपीचंद पडळकरांना दिला असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
गोपीचंद पडळकरांची खालच्या शब्दांत टीका
माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला.
तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केला आहे. याशिवाय जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का? अशी अत्यंत खालच्या शब्दांत टीका पडळकरांनी केली आहे. यामुळे आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
हेही वाचा : “अशी व्यक्ती शोधा जी…”; अभिनेत्री श्रद्धा कपूर राहुल मोदीच्या प्रेमात? व्हिडीओतून दिली मोठी हिंट म्हणाली…





