Success Story : शेत जमीन तलावाच्या जवळ असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. मात्र पावसाळ्यात शेती करण खूप कठीण जात. अशा अडचणींवर मात करत शेतकरी नारायण सिंह यांनी आपल्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.नारायण सिंह यांच्याकडे स्वतःची 100 बिघे (सहा एकर ) जमीन आहे, पण ते 500-600 बिघे भाडेतत्त्वावर शेती करतात. जिरे आणि इसबगोलची शेती करून नारायण यांचे वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपये इतके झाले आहे.
नारायण हे राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी आहेत. ते त्यांच्या शेतात जिरे आणि इसबगोलची लागवड करतात. नारायण सिंह सांगतात की, ते सुमारे 500 बिघामध्ये जिऱ्याची लागवड करतात. त्यांच्या शेतातील जिऱ्याचे पीक ६ महिन्यांचे आहे. उरलेल्या महिन्यांत त्यांच शेतं पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात, त्यामुळे त्यांना फक्त ६ महिनेच शेती करता येते. कारण त्यांची शेती तलावाच्या परिसरात येतो.
नारायण यांनी सेंद्रिय खतांव्यतिरिक्त, रासायनिक खतांचा देखील वापर सुरु ठेवला आहे. शेतीची परिस्थिती आणि हवामान पाहता त्यांना तास निर्णय घ्यावा लागत असल्याचे ते सांगतात.
जिरे आणि इसबगोलच्या उत्पादन
शेतकरी नारायण सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ते आपला माल थेट बाजारात विकतात. परंतु काहीवेळा आयटीसी लोकही शेतात येतात आणि वाजवी दराने शेतमाल खरेदी करतात. शेतकरी नारायण यांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांच्या भागात जिऱ्याचा भाव 600 रुपये किलोपर्यंत आहे. त्यांना एक बिघा शेतातून सुमारे 70-80 क्विंटल जिरे उत्पादन मिळते. त्याच वेळी, इसबगोलचे उत्पादन एका बिघामध्ये 2 क्विंटलपर्यंत आहे, ते प्रति किलो 200 रुपये दराने कंपन्यांना विकले जाते. या दोन्ही पिकांमधून नारायण सिंह दर महिन्याला एक ते दीड लाख रुपये सहज कमावतात.
जर आपण खर्च आणि नफ्याबद्दल बोललो तर 100 बिघा जिरे पिकासाठी सुमारे 3-4 लाख रुपये खर्च येतो. 100 बिघ्यापासून त्यांना 15 ते 18 लाख रुपये वार्षिक नफा मिळत असल्याचे नारायण यांनी सांगितले.