आपण अनेकदा वेगवेगळ्या अनोळखी लोकांना भेटत असतो. ती व्यक्ती कशी आहे याचा आपण अंदाज बांधत असतो. त्यामुळेच पुढील गोष्टींचा विचार केला तर समोरील व्यक्ती ग्रेट आहे किंवा सर्वसाधारण आहे हे तुम्हाला समजू शकेल. अर्थात हे मुद्दे तुमच्यासाठीही लागू असतील.
अनेकदा आपण लोकांना भेटतो त्यापैकी काहीजण बोलघेवडे, काही जण अंतर्मुख, काहीजण सतत खोटे बोलणारे, काहीजण चापलूसी करणारे, चलाखी करणारे अशा विविध प्रकारचे असतात. जे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे, मनाचे असतात त्यांच्याकडे आपण अधिक लक्ष देण्याची गरज असते.
अशा व्यक्ती त्या स्वतः कशा वागत आहेत याकडे त्यांचे अजिबात लक्ष नसते. कारण त्या मुळातच संवेदनशीलपणे आणि सहज भावनेने वागत-बोलत असतात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आपल्याशी बोलावे, आपल्याला मान द्यावा आपल्याकडे लक्ष द्यावे अशी त्यांची अजिबातच इच्छा नसते. याउलट आता एखाद्या मेळाव्यात समारंभात कार्यक्रमात तुम्ही काही लोक पुढील प्रकारे वागताना
पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते?
फोनवर मोठमोठ्याने बोलणे बोलणारे – सार्वजनिक ठिकाणी किंवा बस मध्ये रेल्वेमध्ये काही व्यक्ती मोठमोठ्याने फोनवर बोलत असतात आपल्या आजूबाजूला आणखी काही लोक आहेत याचा विचार न करता मोबाईलवर मोठ्याने गाणी लावणे संगीत लावणे किंवा व्हिडिओ लावणे अशा प्रकारचे लोक अनेकदा मॉर्निंग वॉकला गेल्यावरही काहीजण मोबाईलवर मोठ्याने गाणी लावून चालत असल्याचे आपण पाहतो. अर्थात आपण इतरांना डिस्टर्ब करतो आहोत याचे त्यांना अजिबातच भान नसते बस मध्ये किंवा लोकल मधून प्रवास करताना दुसऱ्या प्रवाशांसाठी अजिबातच जागा न देणे किंवा ऍडजेस्ट करून न घेणे. बाजूला न सरणारे.
कुठेही थुंकणे किंवा कुठेही कचरा टाकणारे. एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये पटकन मोठा स्लाईस उचलणे. चांगल्या सीटवर
जाऊन बसणे. टॉयलेट मध्ये गेल्यावर सीटवर सगळीकडे पाणी करून ठेवणे. म्हणजे नंतर जाणाऱ्या व्यक्तीला ते स्वच्छ करण्यासाठी त्रास होतो.
सर्वसाधारणपणे अशा व्यक्ती दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करताना दिसत नाही किंवा दुसऱ्याविषयी त्यांच्या मनात उदार भाव नसतात. माणसांच्या वागण्याची आणखी काही उदाहरणे आपण पाहू. आपल्या आजूबाजूला माणसे असली आपण ग्रुपमध्ये चर्चा करत असतो गप्पा मारत असू अशावेळी त्यामध्ये सहभागी न होता फोनवर स्क्रोल करत राहणे किंवा फोनवर बोलत राहणे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला बराच वेळ काहीतरी सांगत असता आणि ती व्यक्ती मात्र दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीत दंग असते किंवा तुमच्या बोलण्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नसतो.
तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही सांगत असाल तर ती व्यक्ती तुमच्या सगळ्या बोलण्याचा संबंध तिचे व्यक्तिगत जीवन तिच्या भावना किंवा तिची मते याच्याशी जोडत राहते अनेकदा काहीतरी वैयक्तिक हितसंबंध असतात आणि मग तुम्हाला अडचणीत आणणारा प्रश्न त्या व्यक्तीकडून विचारला जाता जातो. तुम्ही अनेकदा महत्त्वाच्या गोष्टी सांगूनही त्या व्यक्तीने लक्षात ठेवलेल्या नसतात. व्यक्ती म्हणूनही तुमचे मैत्रीचे नाते याबाबत एखादी व्यक्ती अजिबातच सकारात्मक नसते. अशा सगळ्या व्यक्तींबाबत तुम्ही नेमकेपणाने निर्णय घेण्याची गरज असते कारण या व्यक्ती एखाद्या क्षेत्रात तज्ञ वाकबगार कुशल असल्या तरी व्यक्ती म्हणून त्या माणसांशी चांगल्या वागत असतीलच असे नव्हे त्यामुळे ती व्यक्ती एखाद्या विषयात पारंगत आहे म्हणून ती ग्रेट असेलच असे नाही.