वडिलांना शेताकडे जाताना होणारा त्रास पाहून हिंगोली जिल्ह्यातील एका तरुणाने जिद्दीने प्रदूषणमुक्त ई बाईक बनवली आहे. लोभाजी नरवाडे असं या तरुणांचं नाव.. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील लोभाजी नरवाडे याने भंगारातील साहित्य जमा करून ई बाईक बनवली आहें. एखादी वस्तू, वाहन, खराब झाले की आपण एक तर अडगळीला टाकतो, नाहीतर भंगारात टाकतो. परंतु पार्डी (खुर्द) येथील लोभाजी या २० वर्षीय होतकरू आणि शेतकरी कुटुंबातील युवकाने भंगारातील साहित्य गोळा करून चक्क उपयोगात येणारी दुचाकी बनविली आहे.