बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात उन्हाचा पारा 40 च्या वर गेला असून यंदाच्या वर्षी कडाक्याच्या उन्हाळ्याने वर्हाडी मंडळी हैराण झाले आहे. त्यात लग्नसराईने तर व-हाडी मंडळींना अगदी नको-नकोसे केले आहे. या संधीचा फायदा मात्र लोकसभेचे उमेदवार व नेतेमंडळी पुढारी मंडळी घेत आहेत.
लग्न समारंभात तासभर पुढार्यांची भाषणे ऐकून घ्यावी लागत आहेत. थंड पेय, उसाचा रस, आईसक्रिम,थंड पाणी यासाठी वधू-वरांच्या पाहुण्यांची शोधाशोध सुरू असते. तर मंगल कार्यालयात जेवणासाठी बराच वेळ नंबर लाऊन ताटकळत उभा रहावे लागते. लग्नसराई म्हणजे वधू-वरांना आनंद तर नातेवाइकांच्या डोक्याला उन्हामुळे ताप होऊ लागला आहे.
उन्हाची तीव्रता रोजच वाढत आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा क्षण, त्यामुळे या लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी प्रत्येकाचाच आटापिटा सुरू असतो. मे महिन्यात भरपूर लग्नतिथी आहेत.
यावर्षीच्या उन्हाळ्याने नागरिक त्रस्त झाले आहे. कारण लग्न सोहळ्याच्या वेळाही जवळपास दुपारी साडेबारा ते अडीच अशा असल्याने नातेवाइकांना अशा लग्न सोहळ्यात हजेरी लावताना मोठी कसरत करावी लागते. भर उन्हाच्या तडाख्याचा विचार न करता आहे.
एकाच दिवशी पाच ते सह लग्नांना हजेरी…
यंदाच्या उन्हाळ्यात जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्टा व पूर्व भागातील आणे पठार पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यातच सध्या लगीनसराईचा महिना सुरू आहे. एकाच दिवशी पाच-सहा लग्नाला हजेरी लावताना नातेवाइकांची चांगलीच तारांबळ होत आहे.
नेते व पुढारी मंडळीचे आशीर्वाद नकोच
लग्न म्हटले की नेते मंडळींचे नवरा-नवरीला आशीर्वाद देण्यासाठी चांगलीच रांगच लागते. यंदा लोकसभेची निवडणूक असल्यामुळे अनेक पुढारी नेते लग्न समारंभाला हजेरी लावत आहेत. लग्न मंडपात उपरण्याने घाम पुसणार्या हजारो नातेवाइकांना घालमेल किमान तासभर या लोकांचे आशिर्वाद ऐकावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जातो. यामुळे लग्नाची वेळही टळून जाते. याचा नाहक त्रास दुरवरून आलेल्या पाहुणे, वन्हाडी मंडळींना होतो.
वधू-वराच्या फोटोशेसने हैराण
आजचा जमाना हा सेल्फी आणि फोटोशेसनचा आहे. लग्न समारंभ पार पडल्यानंतर वधू-वरासोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी होते. आधीच उकाडा आणि त्यात वधू-वराच्या चेहर्यावर कॅमेर्याचे फोकस लॅम्प लावले जात असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास वधू-वराला होतो आहे.