मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यभर “सावरकर गौरव यात्र’ काढणार असल्याची घोषणा होती.
आता या यात्रेला येत्या 30 मार्चपासून प्रारंभ होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
“देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भाजप- शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्च ते 6 एप्रिल याकाळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे,’ असे बावनकुळेंनी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
रणजित सावरकर यांची मागणी,”राहूल गांधींनी जाहीर माफी मागावी अन्यथा… “
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा प्रवास करणार आहे, असे देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.