Sanjay Raut : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री आजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका केली होती. “पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाचने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचारातून परिवाराला मोठे करण्याची राक्षसी भूक लागली आहे”, अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपवर हल्लबोल केला होता. त्यांनी केलेल्या टीकेनंतर आता उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. “स्थानिक नेत्याकडे किती प्रॉपर्टी आहे मला माहितीये असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा मार्ग काहीतरी वेगळा दिसतोय, अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे. अजित पवारांनी बोलताना माझ्यावर ज्यांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते, आता मी त्यांच्याबरोबरच सत्तेत आहे, असे विधानही केले होते. यावर संजय राऊत यांनी अजित पवार भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील तर ते सरकारमध्ये का राहिले आहेत? असा प्रतिप्रश्न केला आहे. त्यांनी शरद पवारांसोबत परत आले पाहिजे, तसेही त्यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे युती झालेली आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. नेमकं काय म्हणाले होते अजित पवार? “राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रात, राज्यात, महापालिकेत सत्ता असताना कधी सत्तेचा गैरवापर केला नाही. मात्र भाजपाच्या स्थानिक नेत्यांना सत्तेची मस्ती, नशा, माज आला आहे. काही लोकांची मालमत्ता कशी वाढली. त्यांनी काय चमत्कार केला की ते कोट्याधीश झाले. भाजप नेत्यांना विकासाची दृष्टी नाही. कोठे आणि काय भ्रष्टाचार करून पैसे कमवता येथील एवढेच ध्येय आहे.” हेही वाचा : Dear Comrade Remake: ‘डिअर कॉम्रेड’ रीमेकच्या अफवांवर सिद्धांत चतुर्वेदीने सोडले मौन; म्हणाला, “आता माझ्यासाठी कोणताही रीमेक नाही”