पुणे – तांदळाच्या निर्यातीत 2020-21 मध्ये भारत उच्चांक गाठणार आहे. सुमारे 140 लाख टन निर्यात चालू आर्थिक वर्षात होईल, असा अंदाज व्यापारी आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (फाम) वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी वर्तविली.
मागील वर्षी (2019-2020) मध्ये देशातून तांदळाची निर्यात 99 लाख टन झाली होती. ही आठ वर्षांतील सर्वात कमी निर्यात होती.
यंदा मात्र देशात सर्वत्र तांदूळ उत्पादित क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे बासमती आणि इतर सर्व प्रकारच्या तांदळांचे भरघोस उत्पादन येणार आहे.
देशातून मुख्यत्वे इराण, इराक आणि सौदी अरेबिया येथे बासमती तांदळाची निर्यात होते. तर, बांगलादेश, नेपाळ, बेनिन आणि सेनेगल देशांत नॉन बासमती तांदुळाची निर्यात होते.
परंतु यावेळी आफ्रिकन देशांकडूनही नॉन बासमती तांदळाला मागणी वाढली आहे. त्यामुळेही यावर्षी निर्यातीत वाढ होईल.