– प्रभात सिन्हा, आयटीतज्ज्ञ
एसआयला सुरक्षित, विश्वासार्ह, रचनात्मक, कल्याणकारी स्वरुप देत एआय उपकरणाला अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘ग्लोबल पार्टनरशीप ऑन आर्टिङ्गिशयल इंटिलिजन्स’ (जीपीएआय)ची स्थापना जून 2020 मध्ये करण्यात आली. अलीकडेच जीपीएआयची परिषद पार पडली. यावेळी भारताने एआयचा सकारात्मक वापर करण्यासाठी संस्थागत यंत्रणा विकसित करण्याचा सल्ला दिला आहे.
एआयचा वापर आणि प्रसाराच्या आघाडीवर जागतिक पातळीवरच्या संस्थेत आघाडीची आणि महत्त्वाची भूमिका असणे हे तंत्रज्ञान, एआय आणि जागतिक समायोजनात भारताचा वाढत्या सहभागाची पावती आहे. जीपीएआय संघटना ही जगातील सामाजिक, सर्वसमावेशक विकासासाठी ‘एआय’ची जबाबदारी निश्चित करण्यात यशस्वी होईल, अशी आशा आहे.
गेल्यावर्षी 30 नोव्हेंबर रोजी ‘ओपन एआय’कडून चॅटजिपीटीचे अनावरण झाल्यानंतर खूपच कमी काळात कृत्रिम प्रज्ञा (एआय) चा जगभरात वापर आणि प्रसार वेगाने वाढला आहे. एआयचे तंत्र सध्याच्या काळात हे नक्कीच लाभदायी आणि ङ्गायदेशीर ठरत आहे. मात्र अलिकडच्या काळात त्याच्या दुरपयोगाचे उदाहरणेही आली आहेत.
तंत्रज्ञान कोणतेही असो, त्याचा दुरपयोग होण्याची शक्यता राहतेच, मग त्याला एआय देखील अपवाद नाही. एआयचा वापर हा मानवता कल्याण आणि विकासासाठी व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एसआयला सुरक्षित, विश्वासार्ह, रचनात्मक, कल्याणकारी स्वरुप देत एआय उपकरणाला अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘ग्लोबल पार्टनरशीप ऑन आर्टिङ्गिशयल इंटिलिजन्स’ (जीपीएआय)ची स्थापना जून 2020 मध्ये करण्यात आली. 12 डिसेंबर 2023 रोजी जीपीएआयची नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे तीन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत 2024 मध्ये ग्लोबल पार्टनरशीप ऑन आर्टिङ्गिशियल इंटेलिजन्सचे नेतृत्व करणार आहे.
गेल्या तीन शिखर संमेलनाचे आयोजन अनुक्रमे मॉट्रिंयल, पॅरिस, टोकिओ येथे करण्यात आले होते. जीपीएआय ही भारत, अमेरिका, ब्रिटन, युरोपीय संघ, जर्मनी, इस्राईल, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, बेलिज्यम आणि ङ्ग्रान्ससारख्या 29 देशांची एक जागतिक संघटना आहे. ही संघटना एआय तंत्रज्ञान निर्मिती आणि प्रसारात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान, उद्योग, नागरिक, समाज, सरकार, आंतरराष्ट्रीय संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम करते. सध्याच्या शिखर संमेलनात एआयमधील प्रगती आणि यशावर लक्ष केंद्रीत केले. प्रामुख्याने सामाजिक कल्याणासाठी त्याच्या क्षमतेच्या आकलनावर भर दिला जात आहे. शिखर संमेलनात दीडशेपेक्षा अधिक एआय स्टॉर्टअप प्रदर्शनाशिवाय कार्यशाळा, उद्योग तज्ञांच्या बैठका, सार्वजनिक क्षेत्रातील वापरासंबंधी जबाबदार म्हणून एआयला समोर आणणे, संशोधन आदींचे आयोजन करण्यात आले. तसेच स्टार्टअप्ससाठी गेमचेंजर सारखे पुरस्कार सोहळे आयोजित करण्यात आले होते.
ताज्या अहवालानुसार, एआयचा वापर विनाशकारी जैव शस्त्रे तयार करण्यासाठी केला जावू शकतो. यावर्षी 40 हजार विविध आणि संभाव्य घातक घटकांची माहिती देण्यासाठी एका एआय उपकरणाचा वापर झाल्याचे उघडकीस आले आहे. एआयच्या वापरामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय लक्ष्य भेदणारे आणि हल्ला करणारे स्वतंत्र शस्त्र म्हणून विकसित करता येऊ शकते. कार्यप्रणालीची अंमलबजावणी करणे, माहिती गोळा करणे, कच्चे दुवे हेरणे यासाठी सायबर ह्ल्यात एआयचा वापर वेगाने वाढला आहे. या माध्यमांतून संवेदनशील डेटा अणि माहितीचा प्रवाह विविध देशातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून होण्याचा धोका वाढला आहे. ही बाब वेळीच रोखणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ‘एआय’ आधारित उपकरणे दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोका वाढल्याची शक्यता व्यक्त केली. तसेच सायबर सुरक्षा आणि डेटा चोरीची भितीही वाढली आहे. अशा कृत्यापासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. एआयचा सकारात्मक वापर करण्यासाठी संस्थागत यंत्रणा विकसित करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ‘एआय’ हे 21 व्या शतकाच्या विकासातील महत्त्वाचे माध्यम असण्याबरोबरच विनाशाचे मोठे हत्यार असल्याचेही म्हटले आहे. मोदी यांनी एआयचा वापर सामाजिक आणि सर्वसमावेशक विकासाठी करण्याचे आवाहन केले.
कृषी आणि आरोग्य क्षेत्रासारख्या पायाभूत क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. मायक्रोसॉफ्ट ‘एआय’ संचलित रोबो विकसित करत आहेत आणि त्यासाठी कृषी कंपन्यांशी सहकार्य वाढवत आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स ङ्गाउंडेशन एआयचा वापर करत किटकनाशके आणि रोगराईपासून संरक्षित असणारे पिक विकसित करण्यासाठी संशोधनात गुंतवणूक करत आहे. आयबीएम वॉटसनचा वापर रुग्णालयात एक्सरे, ङ्गोटो विश्लेषणासाठी करत कर्करोगावर परिणामकारक उपाय करण्यासाठी करत आहे.संशोधक डीपमाइंडच्या अल्ङ्गाङ्गोल्डपासून प्रोटिन आरखड्याचे भाकित करत असून त्यानुसार औषध आणि उपचार पद्धतीत विकास होऊ शकतो.
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या भाषणात एआयमधील उल्लेखनीय प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, बर्याच काळापासून एआयवर काम सुरू असले तरी गेल्या दीड वर्षात या क्षेत्रातील गती पाहता तो विकास सर्वसमावेशक असायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारत यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. एआयचा वापर आरोग्यासारख्या महत्त्वाच्या सेवा सुलभ करणे आणि अचूक तंत्रज्ञानाच्या वापरातून कृषी क्षेत्रात सुधारणांच्या प्रयत्न करणे यावर देखील चर्चा करण्यात आली. जीपीएआय शिखर संमेलनाच्या माध्यमातून डेटा सुरक्षेबरोबरच खासगी संस्थांची डेटा मालकी आणि वापर निश्चित करण्याचेही प्रयत्न केले गेले आणि होत राहतील. एकुणातच एआय वापर आणि प्रसाराच्या आघाडीवर जागतिक पातळीवरच्या संस्थेत आघाडीची आणि महत्त्वाची भूमिका असणे हे तंत्रज्ञान, एआय आणि जागतिक समायोजनात भारताचा वाढत्या सहभागाची पावती आहे. जीपीएआय संघटना ही जगातील सामाजिक, सर्वसमावेशक विकासासाठी ‘एआय’ची जबाबदारी निश्चित करण्यात यशस्वी होईल, अशी आशा आहे.