पुणे – स्पेस सिस्टमच्या कार्यासाठी घटकांच्या गंभीरतेबद्दल आणि सिस्टमच्या सुरक्षिततेसाठी आणि कार्यासाठी ‘एनडीई’ तंत्रज्ञान अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर, इस्रोचे संचालक डॉ. व्ही. नारायणन यांनी केले.
‘इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (ISNT), तर्फे ‘नॉन-डिस्ट्रक्टिव्ह इव्हॅल्युएशन अँड एनेबलिंग टेक्नॉलॉजीज ‘ (एनडीई २०२३) या विषयावर 33 वी वार्षिक परिषद आणि प्रदर्शन सात ते नऊ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. याचे उदघाटन ‘डीआरडीओ’ चे अध्यक्ष आणि आर अॅंड डी विभागाचे सचिव डॉ. समीर व्ही. कामत याच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इस्रोचे संचालक डॉ. व्ही. नारायणन उपस्थित होते. ते म्हणाले, संरचनात्मक अखंडता, सुरक्षितता, कार्यक्षमता, वृद्धत्व, जीवन अंदाज आणि जीवन मूल्यमापन सुनिश्चित करण्यासाठी, विविध उद्योगांमध्ये ‘नॉन-डिस्ट्रक्टिव्ह इव्हॅल्युएशन अँड एनेबलिंग टेक्नॉलॉजीज (एनडीई) हा एक महत्त्वाचा घटक आहे. उद्घाटन समारंभात मुख्य भाषणात डॉ. व्ही. नारायणन यांनी अंतराळ मोहिमेच्या यशासाठी एनडीईच्या भूमिकेबद्दल सांगितले.
डॉ. समीर व्ही. कामत म्हणाले, प्रत्येक उद्योगासाठी विना-विध्वंसक मूल्यमापन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासारखे आहे. ‘आर अॅंड डी’साठी विध्वंसक चाचणी कशी महत्त्वाची आहे,’एनडीई’ हा वापरण्यायोग्य प्रणालींच्या गुणवत्तेची हमी देणारा उपाय आहे, यावर डॉ. कामत यांनी प्रकाश टाकला. या परिषदेला उद्योगांच्या विस्तृत स्पेक्ट्रममधील सहभागी उपस्थित आहेत, या वस्तुस्थितीबद्दल त्यांनी कौतुक केले. परिषदेच्या शेवटी एनडीई समुदायासाठी तंत्रज्ञानाचा रोड-मॅप तयार करण्याचे त्यांनी सर्वांना सुचवले.
डॉ. कामत यांनी स्मरणिकेचे प्रकाशन केले. डॉ. कामत आणि नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमादरम्यान विविध राष्ट्रीय एनडीटी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘एनडीई’ उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचे प्रदर्शन करणार्या भारत आणि परदेशातील सुमारे 70 प्रदर्शकांसह अत्याधुनिक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. नारायणन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शकांनी लाइव्ह प्रात्यक्षिके दिली आणि या क्षेत्रात प्रगती साधणारी साधने आणि पद्धतींची माहिती दिली.
डॉ. नारायणन यांनी ‘भारतीय अंतराळ कार्यक्रमाचा उदय – आमच्या राष्ट्राचा अभिमान’ या विषयावर स्मृती भाषण दिले. थर्मेक्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांचेही भाषण झाले.