सासवड -यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणामध्ये समन्वयाचे युग आणले. त्यांणी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक पैलू निर्माण केले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला काही दिल असेल तर मला वाटते शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व दिले असे ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील मेडिकल असोशिएशन हॉल येथे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व समन्वयक परिवार पुरंदर यांच्या वतीने यशवंतराव यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस डॉ. सबनीस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, शामकांत भिंताडे, माणिकराव झेंडे पाटील, पुष्कराज जाधव, गौरी कुंजीर, प्राचार्य इस्माईल सय्यद, कुंडलीक मेमाणे, नंदुकाका जगताप, संतोष पवार, अमोल नवले, बळवंत गरुड, अभिजित जगताप, रामदास जगताप, रविंद्र ताकवले, एम. के. गायकवाड, कांचन निगडे,
युसूफ सय्यद, कुमोदिनी पांढरे, निता सुभागडे, अँड. प्रकाश खाडे, अँड. धनंजजय भोईटे, ऍड. कला फडतरे, ऍड. लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन तालुका समन्वयक मयूर जगताप यांनी केले. साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी प्रास्ताविकात केले. सूत्रसंचालन प्रमोद कारकर यांनी तर आयोजक युवा नेते ऋषीकेश झेंडे यांनी आभार मानले.