नेपाळच्या स्वातंत्र्यास भारत बांधलेला राहील
काठमांडू, दि. 17 – नेपाळ राज्याची प्रादेक्षिक अखंडता भारत सुरक्षित ठेवील. त्या गोष्टीस भारत बांधलेला राहील, असे परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी “रायझिंग नेपाळ’ या इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना सांगितले. वाजपेयी पुढे म्हणतात, नेपाळच्या भोवती शांतता परिसर कायम ठेवण्याचा भारत प्रयत्न करील. वाजपेयी यांनी नेपाळी लोकांना भारतात हिंडण्यासाठी परवाना, व्यापार, भारत-नेपाळ संयुक्त संबंध यावरही मत प्रदर्शित केले.
कृष्णवर्णीय तरुणी प्रथमच “जगत सुंदरी’
सांतो, डॉमिंगो – मिस जानेली कमिशन नावाची त्रिनिदादची सुंदरी (वय 24) हिला “जगत सुंदरी’ हा बहुमान जाहीर झाला. मिस कमिशन ही कृष्णवर्णीय तरुणी प्रथमच या बहुमानाला पात्र ठरली आहे. 80 स्पर्धेक तरुणींतून हिची निवड झाली.
हुकुमशाही म्हणजे सर्वनाश
नवी दिल्ली – हुकुमशाही म्हणजे सर्वनाश. म्हणून एकाच व्यक्तीच्या हाती राजकीय सत्ता कधीही केंद्रित केली जाणार नाही, असे उद्गार पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी काढले.