Lok Sabha Election 2024 । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी मोदी यांनी टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांवर जोरदार निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवण्यात आले आहे. ते हिंदूंना नदीत बुडवतील, असे TMC नेते सांगतात. असं म्हणत मोदींनी निशाणा साधला आहे.
मोदी पुढे म्हणाले,’टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब बनवण्याचा गृहउद्योग सुरू आहे. घुसखोर टीएमसीच्या संरक्षणाखाली फोफावत आहेत. बंगालमध्ये श्रद्धेचे पालन करणे देखील गुन्हा बनला आहे. बंगालमधील टीएमसी सरकार रामाचे नाव घेऊ देत नाही. बंगालमध्ये रामनवमी साजरी करण्यास टीएमसी सरकार परवानगी देत नाही. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या लोकांनीही राम मंदिराविरोधात आघाडी उघडली आहे.’ असेही ते म्हणाले आहे.
Lok Sabha Election 2024 । यावेळी प्रचार सभेत बोलतांना मोदींनी या पाच हमी दिल्या…
-धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही.
-एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण कोणीही संपवणार नाही.
-रामनवमी साजरी करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.
-राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोणीही मागे घेऊ शकणार नाही.
-CAA कायदा कोणीही रद्द करू शकणार नाही.