– अनिल जोशी
ऊर्जेमुळे जगभरात नवीन संकट निर्माण झाले आहे. आता विकसित देश आणि विकसनशील देशांतील मतभेद आणि स्पर्धा ही कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावरून आहे. कोळशाच्या अधिक वापराने काळा धूर जमा होत आहे. विकसनशील देशात ऊर्जेसाठी अन्य कोणताही मार्ग किंवा स्रोत नसल्याने त्यावरचे अवलंबित्व वाढले आहे. दुसरीकडे विकसित देश मात्र पृथ्वीला संकटात टाकण्यात विकसनशील देश जबाबदार असल्याचे खापर ङ्गोडत आहेत. आता या देशांचे पोट भरले असून ते दुसर्यांना सल्ला देत आहेत. वास्तविक, वातावरणीय बदलांचे मूळ बदलत्या भोगवादी जीवनशैलीत आहे. त्यामुळे विलासीपणाची हाव सोडून देणे हा यावरचा तरणोपाय आहे.
गेल्या दोनशे वर्षांत आपण ज्या वेगाने आपल्या सवयी, सुविधा बदलण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा दुपट आणि तिपट वेगाने निसर्गात बदल झाला आहे. ही गंभीर बाब अधिक समजून घेणे महत्त्वाचे ठरते. कारण शेवटी सुविधा, विकास किवा आपल्या पोटापाण्याचा प्रश्न हा थेटपणे किंवा अप्रत्यक्षपणे का होईना निसर्गाच्या स्रोताशी जोडलेला आहे. असे घडत असेल तर बदलत्या वातावरणात निसर्ग आणि पर्यावरणाचा सर्वाधिक ङ्गटका या घटकांनाच बसणार आहे. अर्थात ही बाब अधिक खोलवर सांगण्याची गरज नाही. ते जाणून घेण्याासाठी गेल्या दोन दशकांपासून अनेक प्रयत्न झाले. निसर्गाशी संबंधित संशोधक आणि अभ्यासकांना या बदलाचे संकेत मिळाले आणि बदलत्या निसर्गाचा संदेश जनमानसांपर्यंत पोचण्यासाठीही प्रयत्न झाले आहेत.
सध्या ज्या रितीने आपण जीवनशैलीला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यातून आता ङ्गारशी अपेक्षा राहिलेली नाही. कारण पृथ्वीला देखील मर्यादा आहेत. त्यामुळेच आपण कोठे ना कोठे तथाकथित विकासावर अंकुश बसवणे गरजेचे झाले आहे. निसर्ग ही मानवी जीवसृष्टीची सर्वांत मोठी गरज आहे. त्यामुळेच निसर्ग संवर्धनासाठी मोठी चळवळी उभ्या राहिलेल्या दिसून आल्या आहेत. तथापि, निसर्ग हा केवळ गरजेसाठी आहे, मानवाच्या ऐशोरामाच्या गरजा किंवा विलासी वृत्तीतून निर्माण झालेला हव्यास पूर्ण करण्यासाठी नाही. परंतु कालांतराने ऐशोराम ही आपली गरज बनली. कालांतराने आरामदायी जीवन ही निकड वाटू लागली. आपण त्याच्या आहारी कधी गेलो, याचा थांगपत्ताही लागला नाही. परंतु आता त्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की पृथ्वी हे ओझे आता सहन करू शकत नाही.
परिणामी काही गरजांना कठीण काळातून जावे लागेल. छंदांचे अनेक उदाहरणे पाहवयास मिळतील. मोटारीचे पाहा. वाहननिर्मिती करणार्या कंपन्यांनी किती प्रकारची उत्पादने बाजारात आणली आहेत. त्याला आता स्टेट्स सिम्बॉल जोडला आहे. याखेरीज अन्य सुविधांचा विचार केल्यास एसी, टीव्हीचे उदाहरण घ्या. मर्यादेत असेपर्यंत सर्वकाही ठिक होते. परंतु आता त्यातील वैविध्यपणा आणि रिमोट तंत्र आले आहे. म्हणजेच शारीरिक श्रम न करता सर्वकाही करायचे आहे. पायातील चपला देखील हजार रुपयांच्या घरात गेल्या आहेत. सर्व ब्रँड आणि स्टेट्सला जोडले जात आहेत. या मोठ्या बाजारपेठेने आपल्याला चोहुबाजूंनी घेरले आहे. दुर्देवाने अशा प्रकारचे लोक जगात अगोदर नव्हते, परंतु शहराच्या विकासाने मागणी वाढली आहे. त्याच्या विळख्यात ग्रामीण भागही आला आहे.
शहरे ही आता सुविधा आणि आरामाचे केंद्र बनत असून गर्दी वाढतच चालली आहे. आज जगातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या शहरात आली आहे. पूर्वी अशा प्रकारच्या जीवनशैलीचा उपभोग केवळ दहा टक्केच लोक घेत होते. आता सर्वांची या जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यांच्याकडे पाहणार्या अनेक घटकांवर देखील परिणाम झाला आहे. आपण ज्या रितीने हौस आणि छंद जोपासत आहोत, त्याची भरपाई व्यापक रुपाने करावी लागत आहे. उदा. शहरांची वाढती संख्या हे जीवंत उदाहरण आहे. आपल्या सर्वांना सर्व सर्वसुविधायुक्त कन्ङ्गर्ट झोन हवा आहे. शहरातच रोजगाराचे मार्ग उपलब्ध आहेत असे आपण गृहित धरून चालत आहोत. आपण एकीकडे शेतीसारखे पारंपरिक रोजगाराचे मार्ग बंद केलेले असताना औद्योगिक क्रांतीनंतर त्याचा आकार खूपच लहान केला आणि त्याची जबाबदारी एका विशिष्ट घटकांवर सोपवून हात झटकले आहेत.
जगभरात गेल्या शंभर दोनशे वर्षांच्या तुलनेत शेतीचे आकारमान कमी झाले. एवढेच नाही तर शेतीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. आपल्या प्राथमिक गरजा बदलल्याने कृषी क्षेत्राच्या वैविध्यपणावर परिणाम झाला. आता अमेरिकेचेच उदाहरण घ्या. त्याने शेतीचे रुप एवढे पालटून टाकले की आता इंधन उत्पादन करणार्या शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. मक्याचा उपयोग इथेनॉलच रुपाने केला जात आहे. आता हे प्रस्थ जगाच्या कानाकोपर्यात पोचले आहे. जगातील असंख्य देश जसे अमेरिका, जपान अरबमध्ये शेती ही त्यांच्या जीडीपीच्या एक ते तीन टक्क्यांच्या आसपास राहत आहे.
साहजिकच ऊर्जा ही मोठी गरज असून शहरांच्या वाढत्या संख्येने आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक परिणाम होत आहे. ऊर्जेमुळे जगभरात नवीन संकट निर्माण झाले आहे. आता विकसित देश आणि विकसनशील देशांतील मतभेद आणि स्पर्धा ही कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावरून आहे. कोळशाच्या अधिक वापराने काळा धूर जमा होत आहे. विकसनशील देशात ऊर्जेसाठी अन्य कोणताही मार्ग किंवा स्रोत नसल्याने त्यावरचे अवलंबित्व वाढले आहे. दुसरीकडे विकसित देश मात्र पृथ्वीला संकटात टाकण्यात विकसनशील देश जबाबदार असल्याचे खापर ङ्गोडत आहेत. आता या देशांचे पोट भरले असून ते दुसर्यांना सल्ला देत आहेत. परंतु ही गोष्ट हाताबाहेर गेली आहे, पण ती महत्त्वाची मानावी लागेल.
कारण गेल्या एक दशकात अनेक प्रयत्न करूनही स्थिती ढासळली आहे. 2023 मध्ये 2022 च्या तुलनेत ‘सीओ-2’ चे एक टक्के अधिक उर्त्सजन झाले आहे आणि गेल्यावर्षी जुलै महिना हा सर्वाधिक उष्ण मानला गेला आहे. याशिवाय हवामान आटोक्याबाहेर गेल्याचे दिसत असेल तर दिवस बदलले आहेत, असे समजा. 2024 हे वर्ष मागचा विक्रम मोडण्यास तयार आहे. आपल्या देशात तर 2016 ला सर्वाधिक उष्ण म्हणून गृहित धरले होते. देशातील सर्वाधिक तापमान हे याच काळात होते. परंतु आता 2024 च्या प्रारंभापासूनची स्थिती पाहिली तर कदाचित मागचा विक्रम देखील मोडला जाईल.
आता एकच महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि ते म्हणजे जीव मोलाचा की विलासी जग? आपले आयुष्य निरोगी असेल तरच सुंदर जगाचा अनुभव घेता येईल. त्यामुळे आपण मर्यादित कसे राहावे हे पाहिले पाहिजे. कम्ङ्गर्ट आणि आरामदायी जीवनावर अंकुश बसवायला हवा. कारण आपण तातडीने त्यावर अंमलबजावणी केली नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. उद्याऐवजी आजच शेवटाकडे वाटचाल सुरु होईल.