मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी लागेल हे सध्या सांगणे अवघड असले तरी मात्र सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश, घटनापिठातील निवृत्त होणार असल्याने निकाल लवकर लागेल ही अपेक्षा आहे, असे मत जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी यांनी मांडले आहे. ते आज नाशिमध्ये बोलत होते.
निकम म्हणाले की, ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ होते. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे.
न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. 13 आणि 14 मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे 8 ते 12 याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.